मास्क मुक्त होणार महाराष्ट्र मास्क घालणे आता बंधनकारक नाही
![](http://maharashtranews9.com/wp-content/uploads/2022/03/IMG_20220331_195628-780x470.jpg)
राज्यात आता कोरोनाचे सर्व निर्बंध काढून टाकण्यात आले आहे. मास्क घालणे देखील आता बंधनकारक राहणार नाही असे राज्याचे गृहराज्य मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे.
“मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळाने उद्यापासून अर्थात १ एप्रिलपासून महाराष्ट्रातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
ज्यांना वाटत असेल मास्क लावावा, त्यांनी तो लावावा. ज्यांना वाटत असेल मास्क लावू नये, त्यांनी लावू नये. आता कोणतंही बंधन राज्यात राहिलेलं नाही”, अशी माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. त्यामुळे आता गुढी पाडवा, रमजान, राम नवमी असे सण साजरे करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
येत्या १ एप्रिल ते ८ एप्रिलपर्यंत राज्य सरकारने संचारबंदी लागू केली होती. या पार्श्वभूमीवर गुढीपाडवा, रामनवनी हे सण कसे साजरे करायचे? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता. विरोधकांनी यासंदर्भात राज्य सरकारवर सातत्याने टीका केली होती. यानंतर आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानंतर हे सण धूमधडाक्यात साजरे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. १ एप्रिल अर्थात उद्यापासून हे निर्बंध उठवण्यात आले आहेत. यासंदर्भात गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून देखील माहिती दिली आहे.