अंधेरी पश्चिम विधानसभाआपली मुंबईआमची मुंबईमहाराष्ट्रमुंबई
गोखले पुलाचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न .
आमदार अमीत साटम यांनी ‘गोखले पुल- एक यशाची गाथा’ असे पुस्तक लिहावे - ॲड. आशिष शेलार (सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री)

गोखले पुलाचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न …
आमदार अमीत साटम यांनी ‘गोखले पुल- एक यशाची गाथा’ असे पुस्तक लिहावे – ॲड. आशिष शेलार (सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री)
मुंबई – गोखले पुलाच्या दुसऱ्या भागाचे उद्घाटन रविवारी संध्याकाळी भाजपचे सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते आणि अंधेरी (पश्चिम) येथे पार पडले. यावेळी बोलताना आशिष शेलार यांनी हा गोखले पुल म्हणजे भविष्यात मुंबईच्या गतीने होणाऱ्या विकासाची एक झलक असल्याचे सांगितले. तसेच अंधेरी पश्चिम विधानसभा आमदार अमीत साटम यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी प्रकल्प जलद गतीने पूर्ण होण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असे कौतुकाने उल्लेख करत आमदार अमीत साटम यांना ‘गोखले पुल- एक यशाची गाथा’ असे पुस्तक लिहिण्याचा त्यांनी सल्ला दिला.

या कार्यक्रमात प्रास्ताविक भाषण करताना आमदार अमीत साटम यांनी गोखले पुल प्रकल्पाचा इतिहास मांडला. अलिकडच्या काळात बीएमसीने सर्वात जलद गतीने पूर्ण केलेल्या प्रकल्पांपैकी एक असू गोखले पूल बंद झाल्यानंतर १५ महिन्यांच्या आत एक बाजू कार्यान्वित करण्यात आली आणि २८ महिन्यांच्या आत पूर्णपणे कार्यान्वित करण्यात आली. हा एक असाधारण अभियांत्रिकी पराक्रम आहे उल्लेख केला. त्याचे कारण एका सक्रिय रेल्वे मार्गावर बांधकामाचा समावेश होता. याउलट, ऑगस्ट २०१८ मध्ये काम सुरू झाले असले तरी, पाच वर्षांच्या विलंबा नंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये डिलाईल पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. म्हणूनच गोखले पुल बीएमसचा सर्वात जलद पूर्ण झालेल्या प्रकल्पांपैकी एक असल्याचे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.

शिवसेनेचे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बीएमसीच्या अकार्यक्षम आणि अस्पष्टतेमुळे प्रकल्प लांबणीवर कसा पडला हे देखील सविस्तरपणे सांगितले. जुलै २०१८ मध्ये गोखले पुलाचा एक भाग कोसळला होता ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बीएमसीने कोसळलेल्या भागाच्या पुनर्बांधणीचा विचार सुरू केला. तथापि, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बीएमसी प्रशासनाने २० महिन्यांचा विलंबनंतर मार्च २०२० मध्ये कामाचे आदेश जारी केले. तरीही, प्रत्यक्ष काम मात्र नोव्हेंबर २०२१ मध्येच सुरू होऊ शकले. त्यातही रेल्वे ट्रॅकवरील भाग रेल्वे किंवा बीएमसी कोण बांधणार याची स्पष्टता नव्हती.

नोव्हेंबर २०२२ मध्ये उद्धव ठाकरे यांनी प्रगतीचा आढावा घेण्यासाठी अमीत साटम यांनी प्रकल्पस्थळाला भेट दिली होती. त्या भेटीदरम्यान बीएमसीने नियुक्त केलेल्या सल्लागाराने स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर केला. त्यात पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले. स्टीलला मोठ्या प्रमाणात गंज लागला होता आणि कधीही पडू शकत होता, असे समोर आले.
त्यानंतर तत्काळ अमीत साटम यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. मुंबई महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये गोखले पूल बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तत्कालीन मुंबई उपनगरमंत्री मंगल प्रभात लोढा, बीएमसी आणि रेल्वे यांच्यासोबत एक संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती आणि त्यात एक व्यापक पुनर्बांधणी रणनीती आखण्यात आली व तेव्हापासून, प्रकल्पाला लक्षणीय गती मिळाली.

जुना पूल पाडण्याचे काम जानेवारी २०२३ मध्ये सुरू झाले आणि मार्च २०२३ मध्ये नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले. प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आम्ही नियमित प्रकल्पस्थळी भेटी दिल्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री मा. श्री एकनाथ संभाजी शिंदे जी यांच्या सहभागाचा या प्रकल्पाला फायदा झाला होता. तात्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोखले पुलाला पुलाला दोनदा भेट दिली. या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम २६ फेब्रुवारी २०२४ रोजी पुलाचा एक भाग उघडण्यात आला होता यावेळी गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटन प्रसंगी तत्कालिन आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केले होते आमदार अमीत साटम यांचे कौतुक केले होते . पहिल्या टप्प्याचे उद्घाटन झाल्यानंतर फक्त १५ महिन्यांनी. त्यानंतर दुसऱ्या भागाचे काम आता यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. आज गोखले पुल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे याचा मला आनंद असल्याचे आमदार अमीत साटम यांनी आपल्या भाषणांत सांगितले . गोखले पुलाचे उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे खासदार रविंद्र वायकर, अंधेरी पूर्व चे आमदार मुरजी पटेल, मुंबई महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर, सहायक आयुक्त चक्रपाणी , माजी नगरसेवक व मोठ्या संख्येने शिवसैनिक व भाजप कार्यकर्ते उपस्थित होते



