सरन्यायाधीशांना त्यांच्या गृहराज्यातही प्रोटोकॉल मिळाला नाही..*
लोकशाहीचे तिन्ही स्तंभ समान आहेत आणि त्यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे.- भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई

*सरन्यायाधीशांना त्यांच्या गृहराज्यातही प्रोटोकॉल मिळाला नाही..*
*प्रतिनिधी – मिलन शहा.*

भारताचे सरन्यायाधीश झाल्यानंतर, न्यायमूर्ती बीआर गवई रविवारी पहिल्यांदाच मुंबईत पोहोचले. जिथे मुख्य सचिव, डीजीपी आणि मुंबई पोलिस आयुक्त त्यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचले नाहीत. यावर त्यांनी महाराष्ट्र-गोवा बार कौन्सिलच्या कार्यक्रमात निराशा व्यक्त केली.
सरन्यायाधीश गवई म्हणाले, ‘मला अशा किरकोळ मुद्द्यांवर बोलायचे नाही, परंतु महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकारी प्रोटोकॉलचे पालन करत नाहीत याबद्दल मला निराशा झाली आहे.’ लोकशाहीचे तिन्ही स्तंभ समान आहेत आणि त्यांनी एकमेकांचा आदर केला पाहिजे.
*ते पुढे म्हणाले, “जर भारताचे सरन्यायाधीश पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत असतील, तर मुख्य सचिव, डीजीपी आणि मुंबई पोलिस आयुक्त यांनी येथे उपस्थित राहणे अपेक्षित आहे. असे न केल्याने विचार करायला भाग पाडते.”*



